नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या आलेखात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 86 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 1.25 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 47 हजार 905 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 550 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 86 लाख 83 हजार 917 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 4 लाख 9 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 28 हजार 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात 52 हजार 718 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत सुमारे 80 लाख 66 हजार 502 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

With 47,905 new #COVID19 infections, India's total cases surge to 86,83,917. With 550 new deaths, toll mounts to 1,28,121
— ANI (@ANI) November 12, 2020
Total active cases are 4,89,294 after a decrease of 5,363 in the last 24 hrs.
Total cured cases are 80,66,502 with 52,718 new discharges in the last 24 hrs. pic.twitter.com/sHwZwqQcRU